भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण, न्याय मागणी साठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा

भिवंडी ( प्रतिनिधी ) धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन एका 16 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.झालेल्या या घटनेचा निषेध करणे व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणी साठी आज रिपब्लिकन सेक्युलर पक्षाचे नेते अँड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन […]

Continue Reading

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एका इसमाच्या हत्येचा गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.सदर आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे अटक […]

Continue Reading

मा. कपिल पाटील यांच्या हस्ते ई- कार्ट लोकार्पण सोहळा संपन्न

ई- कार्ट योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल- मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील भिवंडी: मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचतगटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवे-अंजूर, ता. भिवंडी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ […]

Continue Reading

आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा बंद, संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा कळशी घेऊन व्यक्त केला आक्रोश

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील पुडांस परिसरातील मोहाचा पाडा येथे पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणीपट्टी बील वसुली  करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त आदिवासी समाज बांधवांनी आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन […]

Continue Reading

भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत पकडलेल्या तिघा जणांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन शांतीनगर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा,सहा मोटर सायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी अटक केलेल्या […]

Continue Reading

बेकायदेशीर रेती उत्खनन करणारा बार्ज, सक्शन पंप केला पेटवून नष्ट,भिवंडी महसूल प्रशासनाची कारवाई,गुन्हा दाखल

भिवंडी:  भिवंडी व ठाणे शहराच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरू सर्रासपणे सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रेती गट विभाग तहसीलदार राहूल सारंग यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या विशेष पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन गांव येथील खाडीपात्रात […]

Continue Reading

गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा – आमदार रईस शेख यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

भिवंडी :-  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने १३८ कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत अशी माहिती  समाजवादी पक्षाचे भिवंडीचे […]

Continue Reading

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग,आगीत वाहने जळून खाक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणून विझवली आहे.याआधी संदर्भात पोलिसांनी […]

Continue Reading

समाजात सर्वत्र महिलांचा सन्मान होणे, हेच खरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करताना, आपण समाजातील सर्व स्तरातील महिला जिथे काम करतात, तिथे त्यांचा योग्य तो मानसन्मान होणे आवश्यक, तसेच त्यांना घरीदेखील या आपल्या परीने मान सन्मान देणे आवश्यक आहे, आपल्या रितीरिवाजाप्रमाणे स्त्री ही पूजनीय आहे, स्त्रीला मातृत्व दातृत्व, याची देणगी आहे, आपण स्त्रीशक्ती रुपात तिची पूजा करतो, भारत […]

Continue Reading

नवीन वर्षाची सुरूवात सर्वंकष स्वच्छता मोहीम पासून, नागरिकांचे सहकार्य अपेक्षित : पालिका आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शहर स्वच्छता मोहिमेवर विशेष लक्ष दिलेलेआहे. मुख्यमंत्री यांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्याचे सूचना सर्व महापालिका यांना केल्या आहेत. त्यानुसार सर्व रस्त्यांची साफसफाई करणे कचरा मुक्त शहर करणे , धूळ प्रदूषण कमी करणे व शहर स्वच्छ करणे यामध्ये झाडलोट , रस्ते धुणे, त्यानंतर अनधिकृत बॅनर पोस्टर्स यावर देखील कारवाई करण्यात येणार […]

Continue Reading